Showing posts with label Live In India. Show all posts
Showing posts with label Live In India. Show all posts

Wednesday, October 14, 2020

*उपयुक्त माहिती...*

*उपयुक्त माहिती...*

*१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?*

*उत्तर :-* ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.

 *२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?*

*उत्तर :-* ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.

 *३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?*

*उत्तर :-* ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .

*४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.*

*उत्तर :-* शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.

*५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?*

*उत्तर :-* प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.

 *६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?*

*उत्तर :-* हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ....

*७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?*

*उत्तर :-* शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..

*८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?*

*उत्तर :-* तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून .

*९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?*

*उत्तर:-* त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ...

*१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?*

*उत्तर :-* फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..

*११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?*

*उत्तर :-* शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून...
सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन...
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे ..

*१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?*

*उत्तर:-* त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.

*१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.*

*उत्तर :-* हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .
अंगठा -आत्मा/ 
तर्जनी -पितर/
मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे...

*१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.*

*उत्तर :-* विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून......

*१५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.*

*उत्तर :-* पितराना दोष लागतो म्हणून .

*१६) उंब-यावर बसून का शिंकू नये.*

*उत्तर :-* उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे......

*१७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.*

*उत्तर :-* झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..

 *१८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये.*

*उत्तर :-* प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..

*१९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?*

*उत्तर :-* याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ....

 *२०) सायंकाळी केर का काढु नये?*

*उत्तर :-* लक्ष्मीला आवडत नाही .
लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते...

 *२१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.*

*उत्तर :-* शव= शिव म्हणून नमस्कार करावा....

*२२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?*

*उत्तर :-* येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते...

*२३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.* 

*उत्तर :-* दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही ...

*सर्वांना ही माहिती द्या..*

🌹 श्री स्वामी समर्थ 🌹

*नवरात्रीत सिद्ध करा नवार्णव मंत्र.*

*नवरात्रीत सिद्ध करा नवार्णव मंत्र.*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*!! नवार्णव मंत्राचा अर्थ..!!*

माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे. 
नवार्ण = नऊ अक्षराचा मंत्र. 
या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे.

भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत, 
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. 
या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे. त्याच बरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे, ज्याने नवग्रहांना शांत केले जाते.

॥ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे ॥ 

नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत, ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे.

ऐं = महासरस्वती चा बीज मंत्र आहे,
ह्रीं = महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे.
क्लीं = महाकालीचा बीज मंत्र आहे.

याच बरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे

प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रम्हचारिणी |
तृतीयं चन्द्रघंटेती, कुश्मांडेती चतुर्थकम ||
पंचमं स्कन्दमातेती, षष्ठं कात्यायनितीच |
सप्तमं कालरात्रीति, महागौरीती चाष्टमम ||
नवमं सिधीदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तिता |
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हनैव महात्मना ||

ऐं = प्रथम =शैलपुत्री = सूर्य
ह्रीं = द्वितीय = ब्रम्हचारिणी = चंद्र
क्लीं = त्रितीय = चन्द्रघंटा = मंगळ
चा = चतुर्थ = कुश्मांडा = बुध
मुं = पंचम = स्कन्दमाता = बृहस्पती
डा = षष्ठं = कात्यायनि = शुक्र
यै = सप्तमं = कालरात्री = शनि
वि = अष्टमं = महागौरी = राहू
च्चै = नवमं = सिधीदात्री = केतू

नवार्ण मंत्राचे प्रथम बीज “ऐं” पासून दुर्गा देवीच्या पहिल्या शक्ती “माता शैलपुत्री” ची उपासना केली जाते, ज्यात “सुर्य ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे द्वितीय बीज “ह्रीं” पासून दुर्गा देवीच्या द्वितीय शक्ती “माता ब्रह्मचारिणी” ची उपासना केली जाते, ज्यात “चंद्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे त्रितीय बीज “क्लीं” पासून दुर्गा देवीच्या त्रितीय शक्ती “माता चंद्रघंटा” ची उपासना केली जाते, ज्यात “मंगळ ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे चतुर्थ बीज “चा” पासून दुर्गा देवीच्या चतुर्थ शक्ती “माता कुश्माण्डा” ची उपासना केली जाते, ज्यात “बुध ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे पंचम बीज “मुं” पासून दुर्गा देवीच्या पंचम शक्ती “माता स्कंदमाता” ची उपासना केली जाते, ज्यात “बृहस्पती ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे षष्ठ बीज “डा” पासून दुर्गा देवीच्या षष्ठ शक्ती “माता कात्यायनी” ची उपासना केली जाते, ज्यात “शुक्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे सप्तम बीजयै” पासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती “माता कालरात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “शनि ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे अष्टम बीज “वि” पासून दुर्गा देवीच्या अष्टम शक्ती “माता महागौरी” ची उपासना केली जाते, ज्यात “राहू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे नवम बीज “च्चै” पासून दुर्गा देवीच्या नवम  शक्ती “माता सिद्धीदात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “केतू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
या त्रिशक्ती जगदम्बा सर्वार्थ सिद्धि मंत्रात एक अशी अलौकिक ऊर्जा समाहित आहे, ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करू शकत नाही. या मंत्रात हजारों गायत्री मंत्राची ऊर्जा समाहित आहे. हा मंत्र मारण, मोहन, वशीकरण, स्तम्भन तथा उच्चाटन आदि क्षत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुचक्रांचा नाशक आहे.

१) मारण = क्रोध, मद, लोभ आदिचा नाश करणे. यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो. या मंत्राच्या जपणे शत्रुपक्षाची शक्ति क्षीण केली जाते.

२) मोहन = आपल्या इष्ट माता भगवती ला प्रसन्न करणे.

३) वशीकरण = या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते, आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो.

४) स्तम्भन = या मंत्राच्या के माध्यमाने आपल्या इन्द्रियांच्या विषय-विकारांना थांबवले जावू शकते.

५) उच्चाटन = या मंत्राद्वारे मोह, ममता, लिप्तता आदि त्याग करून साधक मोक्ष प्राप्ति साठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगता पासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते.

या महामंत्राच्या जपात उपर्युक्त भाव, साधकाच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्या पर्यंतच राहिली पाहिजे. त्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी, या महामंत्राचा लाभ, पूर्ण पात्रताप्राप्त सद्गुरु च्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जावू शकतो.

या त्रिशक्ति जगदंबा सर्वार्थ सिद्धि मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणी सारखा कार्य करतो. साधक जेवढा या मंत्राच्या उर्जेने एकाकार होत जातो, तेवढा तो प्रकृतिसत्तेशी एकाकार होत जातो. या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो.⁠⁠
*जय अंबे जगदंबा*
🚩🚩🚩🕉🚩🚩🚩

माहिती संकलनः श्री दीपक कुळकर्णी.